लव्ह जिहाद कायदा राज्यातही लागू करावा; वारकरी परिषदेची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-उत्तर प्रदेशात एका अध्यादेशाद्वारे ‘लव्ह जिहाद’ कायदा लागू करण्यात आला आहे. त्यांनतर काही इतर राज्यात देखील हा कायदा लागू करण्याच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान आता या कायद्यावरून महाराष्ट्रातही राजकारण पेटू लागले आहे. उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा लव्ह जिहाद विरोधी कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.

या संदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेत राज्य सरकारपर्यंत संघटनेचे म्हणणे पोहोचवण्याची विनंती केली. तसेच या मागणी चे राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रशासनाला निवेदन दिले आहे.

‘देशासह महाराष्ट्रात प्रेमाच्या नावाखाली मुलींना, महिलांना लग्नाचे आमिष दाखवून सामूहिक बलात्कार, तसेच बळजबरीने धर्मांतर या सारख्या घटना सातत्याने घडत आहेत.

अनेक हिंदू मुलींचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. अशा गैरप्रकारांचा बंदोबस्त करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे कठोर कायदा महाराष्ट्र सरकारने सुद्धा करावा,असे राष्ट्रीय वारकरी परिषदेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment