पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून देशभर कृषी कायद्यावरून आंदोलने पेटली आहे. शेतकरी संघटनांसह अनेक राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यातच या मुद्यावरून नगर जिल्ह्यामध्ये देखील निदर्शने करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी दिल्ली येथे मोठे आंदोलन उभा केले आहे. हळूहळू या पुकारलेल्या आंदोलनाची धग आता महाराष्ट्र मध्ये दिसायला लागली आहे.

याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे आज मंगळवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी जाळण्यात आला.

स्वाभिमानीचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी टाकळीमिया येथे बाजार तळावर आंदोलन केले. कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनावर लाठीहल्ला केल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला.

दिल्ली येथे शेतकरी आंदोलनात भाग घेण्यासाठी येत्या तीन दिवसात नगर जिल्ह्यातील स्वाभिमानी’च्या २५ कार्यकर्त्यांसह दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे.” असे जिल्हाध्यक्ष मोरे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment