जगावर आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊ दे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पृथ्वीवरील कोरोना संकटाचा नायनाट कर, असं साईबाबा समाधीला साकडं घातल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

जगावर आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊन सर्वांना गतवैभव व जीवन प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या दिशा निर्देशांचे भाविकांनी काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment