जनतेने स्वत:हून रक्तदान करावे : मुख्यमंत्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-कोरोनाकाळात राज्यातील रुग्णालयांत रक्ताची टंचाई भासत आहे. जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्रोत आहे.

मात्र, कोविडच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे रक्तसंकलनामध्ये अडचणी येत आहेत.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलिस, आरोग्य कर्मचारी योगदान देत आहेत. औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासन स्तरावरून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ५९ रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या २ हजार ५८३ युनिट, मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment