अहमदनगर :- तिनदा लोकसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे खा. दिलीप गांधी यांना भाजप पक्षाकडून डावलण्यात आले.
पक्षाकडून अन्याय होऊनही खा. गांधी यांनी पक्षनिष्ठा राखत डॉ. सुजय विखे यांच्या प्रचाराची कमान सांभाळण्याचा निर्णय घेतला.
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना थांबण्याचा सल्ला दिल्यानंतर खा. दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
कंठ दाटून आलेल्या अवस्थेत खा. गांधी यांनी कसेबसे आपले मत मांडले. यावेळी सभेतून खा. गांधी समर्थकांनी बैठकीतून काढता पाय घेतला होता.
तर खा. गांधी यांच्या अपमानाचा बदला घेण्याचा संदेशही सोशल मीडियावर गांधी समर्थकांनी पसरविला होता.
त्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी खा. गांधी यांची चार भिंतीच्या आत माफी मागितली होती. यामुळे विखे व गांधी यांचे पॅचअप यशस्वी ठरेल का? हे मतमोजणीच्या दिवशीच समोर येणार आहे.
- Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ धांसू फोनची किमत झाली कमी; बघा खास ऑफर…
- पंतप्रधान मोदीच्या धोरणामुळेच कृषि आणि सहकार क्षेत्राला आत्मनिर्भर होण्याची संधी
- Banana Chips Business: दोन लाख रुपये गुंतवणुकीतून सुरू करा केळी चिप्स उद्योग! 50 किलो केळी चिप्स बनवण्यासाठी किती येतो खर्च? वाचा माहिती
- Farmer Success Story: गेल्या 24 वर्षापासून या शेतकऱ्याला आहे भुईमूग पिकाचा हातखंडा! उन्हाळी भुईमुगाचे मिळवतो एकरी 20 ते 22 क्विंटल उत्पादन
- Summer Vacation Trip: उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कमीत कमी खर्चात कुटुंबासमवेत भारतातील ‘या’ ठिकाणांना द्या भेट; उन्हाळ्यात घ्या थंडीचा अनुभव