राहुरी : यंदा दुष्काळाने सर्वत्रच पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अनेक ठिकाणी टॅंकर सुरू आहेत, तर काही ठिकाणी विहिरी, विंधनविहिरींचा आधार घेतला जात आहे. मिळेल तेथून पाणी आणून तृष्णा भागविली जात असताना काही ठिकाणी वादाच्या ठिणग्याही पडत आहेत.
मात्र, राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे पाणी भरण्यासाठी आलेल्या दोन महिलांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेचा कान तुटल्याने एकच खळबळ उडली आहे.
सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे संदीप दिवाकर कवाणे यांच्या शेतातील एअरवॉलजवळ महिला पाणी भरण्यासाठी आल्या होत्या.
याठिकाणी उषा साईनाथ शिंदे यांची मुलगी अस्मिता ही पाणी भरण्यासाठी गेली. यावेळी तिच्याबरोबर मंगल संदीप कवाणे, संदीप दिवाकर कवाणे, शोभा प्रकाश कवाणे यांनी भांडण करून तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली.
हे भांडण सोडविण्यासाठी उषा शिंदे गेल्या असता मंगल कवाणे हिने त्यांचे केस धरून तसेच डाव्या कानातील टॉप्स जोरात ओढल्याने उषा शिंदे यांचा कान तुटून त्या जबर जखमी झाल्या. याप्रकरणी उषा शिंदे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गन्हा दाखल केला आहे.
- काळजी घ्या…! महाराष्ट्रातील ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता, अनेक भागात वादळी पाऊस, IMD चा नवीन अंदाज बघितला का ?
- SNJB Nashik Bharti 2024 : नाशिकमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी; वाचा सविस्तर माहिती!
- UPSC CAPF Bharti 2024 : UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत 506 रिक्त जागांसाठी निघाली मोठी भरती
- State Bank of India : स्टेट बँकेच्या ‘या’ योजनेत मिळत आहे 8 टक्क्यांपर्यंत व्याज, फक्त दोन वर्षात गुंतवणूदार श्रीमंत!
- Hyundai SUV Discount Offers : क्या बात हैं! ह्युंदाईच्या ‘या’ जबरदस्त SUV कार्सवर थेट 4 लाख रुपयांपर्यंत सूट, बघा खास ऑफर