कर्जत – बारामती ऍग्रोच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत केली जाणार आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे. नदीकाठच्या गावांसाठी हा अडचणीचा काळ असून, पूर परिस्थितीत नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन युवा नेते रोहित पवार यांनी केले.
कर्जत तालुक्यातील पूरग्रस्तांची भेट पवार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुक्यातील खेड, औटेवाडी, भांबोरा, दुधोडी, जलालपूर, गणेशवाडी आदी गावांना पुराचा फटका बसला आहे. पवार यांनी आज या भागाचा दौरा करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.
नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आज शाळाही बंद ठेवण्यात आल्या. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी या भागाचा दौरा करून तेथील प्रश्न समजावून घेतले. खेड येथे अण्णासाहेब मोरे, युवा नेते नीलेश निकम, उपसरपंच बाळासाहेब मोरे, सुरेश शिंदे, अक्षय वाघमारे आदींशी चर्चा केली.
- CBI Bharti 2024 : परीक्षेशिवाय CBI मध्ये नोकरी मिळण्याची उत्तम संधी; जाहिरात प्रकाशित
- DIAT Pune Bharti 2024 : पदवीधारक आहात आणि नोकरी शोधताय?, मग वाचा ही बातमी…
- Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात शिपाई आणि ‘या’ पदांची निघाली भरती; शिक्षण 12 वी पास, आजच करा अर्ज!
- Ahmednagar News : स्कुलबस दुचाकीचा भीषण अपघात ! एकाच कुटुंबातील दोघे ठार
- Loksabha 2024 : डॉ. सुजय विखे स्पष्टच बोलले ! केंद्रात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता येण्यापासून कुणी रोखू शकत नाही…