अहमदनगर :- माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा खून करणाऱ्या राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील दोघांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी हा निकाल दिला. पती गोविंद सर्जेराव हारदे (वय ३८), सासरा सर्जेराव हारदे (रा. राहुरी, तुळापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २०१३ मध्ये वैशाली हारदे हिचा खून करण्यात आला होता.
या खटल्यात सरकारी वकिल केदार केसरकर यांनी दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली होती. साक्षीदारांची साक्ष, दाखल कागदपत्रे, परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
तर सासूविरुद्ध पुरावे नसल्याने तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. लग्न झाल्यानंतर दोन मुली व एक मुलगा झाल्यानंतर वैशाली हारदे हिचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. माहेरून चारचाकी गाडी आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता.
- Maruti Suzuki Baleno : कमी किंमतीत उत्तम कार खरेदी करायची असेल तर ‘हा’ पर्याय ठरेल उत्तम!
- Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केला Samsung Galaxy F15 5G चा नवीन व्हेरिएंट फोन, खरेदीवर मिळेल जबरदस्त ऑफर…
- Mini Tractor: छोट्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे महिंद्राचे ‘हे’ पावरफूल मिनी ट्रॅक्टर! कामात दमदार आणि किंमत देखील आहे कमी
- उद्योजक व्हायचे आहे तर मराठा/ कुणबी तरुणांसाठी आहे मोठी संधी! ताबडतोब ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
- पुण्याचा माणूस होता अहमदनगरचा दुसरा खासदार ! कोण होते आर. के. खाडिलकर ?