अहमदनगर :- माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा खून करणाऱ्या राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील दोघांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी हा निकाल दिला. पती गोविंद सर्जेराव हारदे (वय ३८), सासरा सर्जेराव हारदे (रा. राहुरी, तुळापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २०१३ मध्ये वैशाली हारदे हिचा खून करण्यात आला होता.
या खटल्यात सरकारी वकिल केदार केसरकर यांनी दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली होती. साक्षीदारांची साक्ष, दाखल कागदपत्रे, परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
तर सासूविरुद्ध पुरावे नसल्याने तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. लग्न झाल्यानंतर दोन मुली व एक मुलगा झाल्यानंतर वैशाली हारदे हिचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. माहेरून चारचाकी गाडी आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता.
- SNJB Nashik Bharti 2024 : नाशिकमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी; वाचा सविस्तर माहिती!
- UPSC CAPF Bharti 2024 : UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत 506 रिक्त जागांसाठी निघाली मोठी भरती
- State Bank of India : स्टेट बँकेच्या ‘या’ योजनेत मिळत आहे 8 टक्क्यांपर्यंत व्याज, फक्त दोन वर्षात गुंतवणूदार श्रीमंत!
- Hyundai SUV Discount Offers : क्या बात हैं! ह्युंदाईच्या ‘या’ जबरदस्त SUV कार्सवर थेट 4 लाख रुपयांपर्यंत सूट, बघा खास ऑफर
- Ahmednagar News: नगर जिल्ह्यात सोन्यावर डल्ला मारणाऱ्या चोरांची कमाईची भन्नाट युक्ती! वाचाल तर व्हाल अवाक