अहमदनगर :- माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा खून करणाऱ्या राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील दोघांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी हा निकाल दिला. पती गोविंद सर्जेराव हारदे (वय ३८), सासरा सर्जेराव हारदे (रा. राहुरी, तुळापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २०१३ मध्ये वैशाली हारदे हिचा खून करण्यात आला होता.
या खटल्यात सरकारी वकिल केदार केसरकर यांनी दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली होती. साक्षीदारांची साक्ष, दाखल कागदपत्रे, परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
तर सासूविरुद्ध पुरावे नसल्याने तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. लग्न झाल्यानंतर दोन मुली व एक मुलगा झाल्यानंतर वैशाली हारदे हिचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. माहेरून चारचाकी गाडी आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता.
- Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात शिपाई आणि ‘या’ पदांची निघाली भरती; शिक्षण 12 वी पास, आजच करा अर्ज!
- Ahmednagar News : स्कुलबस दुचाकीचा भीषण अपघात ! एकाच कुटुंबातील दोघे ठार
- Loksabha 2024 : डॉ. सुजय विखे स्पष्टच बोलले ! केंद्रात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता येण्यापासून कुणी रोखू शकत नाही…
- Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिणेतून शिवसेनेच्या मातब्बर नेत्याने भरला खासदारकीचा अर्ज ! आघाडीत बिघाडी की बंडखोरी? विखे, लंकेंपुढे आव्हान
- Top Cow Breed In India: ‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या देशी गाईच्या जाती! वाचा वैशिष्ट्ये आणि गाईंची किंमत