22 ऑगस्ट 2019 :- विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
आज जे नेते भाजपमध्ये जात आहेत तेच नेते राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच नेते भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांना पावन करून घेतलं जातं असा हल्लाबोल त्यांनी केला.
ते म्हणाले, बबनराव पाचपुते हे आज भाजपमध्ये आहेत. ते जेव्हा राष्ट्रवादीत मंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
भाजपसाठी त्यावेळी ते ‘बबन्या’ होते. मात्र पाचपुते भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे सर्व आरोप धुतले गेले आणि ते बबनराव झाले अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप राज्यात सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षातल्या नेत्यांना वेचून वेचून लक्ष्य केलं जातं आहे.
त्यांच्याविरुद्ध चौकशांचा ससेमीरा लावला जातोय. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
- AIATSL Pune Bharti 2024 : 10 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना पुण्यात नोकरीची उत्तम संधी; ‘या’ पत्त्यावर मुलाखतीसाठी रहा हजर…
- ठरलं तर ! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित डॉ. सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज…
- मोदीना पंतप्रधान बनविण्यासाठी सुजय विखे पाटील यांच्या रुपाने उमदा शिलेदारला निवडून पाठवायचे !
- Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचं वाटोळं का झालं? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यावर आज स्पष्टच बोलले..
- PDEA Bharti 2024 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळात निघाली शिक्षक पदांची भरती, आजच या पत्त्यावर पाठवा अर्ज!