अहमदनगर : शहरात डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू झाली आहे. मागील आठवड्यात सारसनगरमधील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यानंतर वैदुवाडी येथे राहणाऱ्या मनपा कामगाराचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला.
बाबाजी शिंदे असे मयत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
वैदुवाडी येथील बाबाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. उपचार सुरू असताना रविवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबाजी शिंदे हे मनपाच्या आरोग्य विभागातील कोंडवाडा विभागात हंगामी कामगार म्हणून कार्यरत होते.
कामामध्ये आरोग्य विभागाची असुरक्षितता असल्याने मनपाच्या हंगामी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मनपाकडून साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजन करण्यात येत आहे. शहरात डेंग्यूचे प्रमाण नगण्य आहे.
जरी एखादा रूग्ण डेंग्यू सदृश्य आजाराने बाधीत आढळला तर त्यावर साध्या पध्दतीने उपचार केल्यास तो नियंत्रणात येतो. नागरिकांनी पूर परिस्थिती भागास तसेच साथीचे आजार फैलावलेल्या भागास भेट देण्याचे टाळावे, असे मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.
- PM Surya Ghar Yojana: घराच्या छतावर सोलर रूप-टॉप बसवा आणि 300 युनिट वीज मोफत मिळवा! अशा पद्धतीने करा घरबसल्या अर्ज
- Tourist Place: उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात रेल्वेने प्रवास करून भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या! प्रवासाचा मिळेल सुखद आनंद
- SBI New Rule: स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता ‘या’करिता द्यावे लागतील जास्त पैसे! स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर हे वाचाच….
- Traffic Rule: तुम्हाला माहित आहेत का ‘हे’ तीन महत्त्वाचे वाहतुकीचे नियम? यामध्ये तुम्हाला पोलीस नाही देऊ शकत त्रास
- शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार, आ. नीलेश लंके दुपारी राजीनामा देणार !