निंबेनांदूर : तालुक्यातील नवीन नेतृत्व देण्याची हर्षदा काकडे यांची तयारी आहे. परंतु तुमची साथ हवी असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख ॲड शिवाजीराव काकडे यांनी शहरटाकळी येथे केले.
काल शहर टाकळी येथे जनशक्ती विकास आघाडी जनसंपर्क दौरा वेळी दहिगाव गणाची बैठक शहरटाकळी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण गोरे हे होते.
यावेळी आबासाहेब राऊत, रामनाथ पिसोटे, सूर्यकांत गवळी, डॉ.गोरे, राजेंद्र इथापे, शेषराव आपशेटे, अशोक दातीर, मच्छद्रिं टेकाळे, देवराव दारकुंडे, कुमार फसले, विष्णू दिवटे ,भारत भालेराव, मच्छद्रिं आर्ले, भागचंद माळवदे ,
ज्ञानदेव खराडे, मनोज घोंगडे, शिवाजीराव शेळके, सदाशिव जाधव, विकास गवळी ,भास्कर ठोंबळ, नवनाथ फासाटे इत्यादी प्रमुख उपस्थित होते. यावेळी ॲड. काकडे म्हणाले की दोन-तीन घरातच अदलून बदलून तालुक्याची सत्ता आहे.
सत्तेचा उपयोग यांनी कधीच जनतेच्या विकासासाठी केलेला नाही, फक्त स्वत:चा विकास यांनी साधला तालुक्यातील कोणतेही भरीव असे काम यांचे नाही त्यामुळे जनतेने आता यांना ओळखलं पाहिजे. तुमची खंबीर साथ असल्यास कोणत्याही पक्षाकडून आपण निवडणूक लढवू असेही काकडे म्हणाले.
- आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीटीची शक्यता ! अहमदनगर अन पुण्यातही पाऊस पडणार का ?
- माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे, तुमच्याकडे काय आहे ? डॉ. सुजय विखे पाटील यांचा विरोधकांवर घणाघात
- Ahmednagar Politics : सत्यजित तांबे सांगा कुणाचे ! काँग्रेसचे की बंडखोर नेत्यांचे.. ‘त्या’ घडामोडींमुळे आ. थोरातांच्या भाच्याभोवती राजकीय ट्विस्ट
- छगन भुजबळ थांबले ! अचानक नाशिकमधून माघार, पण का? हे आहे महत्वपूर्ण कारण
- Maharashtra Politics : पक्षफुटीमुळे दोस्त दोस्त न राहा.. ! आधी केला ज्यांचा विरोध, ज्यांनी हरवले आज त्यांचाच प्रचार करण्याची वेळ, पहा ‘गमती’पूर्वक लढती