छत्तीसगड :- राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारने नोकरीतील आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून ८२ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, कोर्टाने सरकारला १० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
राज्य सरकारने चार सप्टेंबर रोजी एक वटहुकूम जारी केला. ‘छत्तीसगड लोकसेवा (अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय आरक्षण) दुरुस्ती वटहुकूम २०१९’नुसार सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणात बदल करण्यात आला आहे.
या वटहुकुमानुसार आता सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जातींचा कोटा १२ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर, इतर मागासवर्गीयांचा कोटा १४ टक्क्यांवरून २७ टक्के करण्यात आला आहे. अनुसूचित जमातींच्या ३२ टक्के आरक्षणात कोणताही बदल करण्यात आला नाही; परंतु आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी असलेले १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.
यामुळे राज्यातील सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. याविरोधात वेदप्रकाशसिंह ठाकूर आणि आदित्य तिवारी यांनी छत्तीसगड उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
- Vehicle Tool Kit: तुमच्या कारसाठी घ्या स्वस्तात मस्त असलेली ‘ही’ टूल किट! गॅरेजवर जाण्याची नाही पडणार गरज
- Onion Export:….. या कारणामुळे कांदा निर्यात बंदी आणखी वाढवली; केंद्राने स्पष्ट केले या निर्णयामागील कारण
- आचार्य श्री.कुंदनऋषीजी महाराज यांनी दिली सुजय विखे पाटलांना विजयाची निश्चिती
- पोकराअंतर्गत आली नवीन विहिरी योजना! शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळेल 100 टक्के अनुदान, वाचा ए टू झेड माहिती
- समृद्धीच्या बोगद्यामधील लाईट यंत्रणा बंद