पारनेर :- भाजप-सेना युती होणार नसल्याचा दावा करतानाच भाजपला शिवसेनालाही संपवायचे आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला. भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मिटकरी यांनी सरकारवर टीका केली. अध्यक्षस्थानी माजी आमदार दादा कळमकर होते.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, बाबासाहेब तरटे, अशोक रोहकले, सुदाम पवार, दादा शिंदे, बापू शिर्के, राहुल झावरे, विजय औटी, कारभारी पोटघन, सुरेश धुरपते, सुवर्णा धागडे यांच्यासह या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा, आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रांनाही गर्दी जमा होत नाही इतकी गर्दी लंके यांच्या मेळाव्यास असून त्यांचा विजय आजच निश्चित झाल्याचे सांगून या वेळी बोलताना मिटकरी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक होत आहे, काळे झेंडे दाखवले जात आहेत. पुरात जनता अडकलेली असताना फडणवीस व ठाकरे हे इन्कमिंगमध्ये व्यस्त होते.
राज्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. कारखाने बंंद पडत आहेत, मराठा आरक्षण लागू केले परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. धनगर, लिंगायतांना आरक्षण नाही, शिवस्मारक, डॉ. आंबेडकरांच्या स्मारकांची कामे झाली नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये या सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे.
जनादेश यात्रेदरम्यान बेरोजगारी, मंदीमुळे बंद पडलेले कारखाने, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार अशा प्रश्नांवर मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्याकडे काहीच मुद्दे नसून काश्मीरमधील ३७० वे कलम पुढे करून ते जनतेला देशभक्ती शिकवत आहेत. तुमच्या रक्तात देशभक्ती मग आम्ही देशद्रोही का? असा सवाल त्यांनी केला.
- तब्बल दहा वर्ष न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या याचिका कर्त्याला अखेर मिळाला न्याय !
- लोकसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरवात ! ‘या’ एप्लीकेशनवरून ऑनलाईन अर्ज करता येणार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रोसेस कशी असणार ?
- नगरकर झालेत घामाघूम, तापमानाचा पारा 39.82 अंश सेल्सिअसवर ! ‘या’ तालुक्यात अवकाळीची हजेरी, आज पावसाचा येलो अलर्ट
- अहमदनगर : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यात सामील ‘त्या’ काँग्रेसी नेत्याचे अखेर निलंबन
- डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात आघाडी ! भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठे पाठबळ…