अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाला जी गती मिळाली नाही. ती गती भाजप सरकारच्या काळात मिळाली. यामुळे नगर राहुरी पाथर्डी मतदार संघात शंभर कोटी रुपयाचा निधी मिळाला.
बजेटच्या रस्त्यासाठी दोन कोटी निधी मिळत होता. मात्र आता भाजप सत्तेवर आल्यापासून दरवर्षी २५ते ३० कोटी रुपयांचा निधी या बजेटच्या माध्यमातून रस्त्यासाठी मिळत आहे. पंचवीस वर्षाचा निधी पाच वर्षात भाजप सरकारमुळे मिळाला असे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती, मांजरसुंबा अंतर्गत रस्ते, पिंपळगाव माळवी ते वांबोरी फाटा रस्ता दुरुस्ती, आढाववाडी अंतर्गत रस्ते, मेहेर बाबा फाटा रस्ता दुरुस्तीआदि विकास कामाचा शुभारंभ आ.कर्डिले यांच्या हस्ते पिंपळगाव माळवी येथे करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास बाजीराव गवारे, संभाजी पवार, सरपंच सुभाष झिने, प्रा.देवराम शिंदे, माजी सरपंच संतोष झिने, एकनाथ गुंड, विश्वनाथ गुंड, इंद्रभान कदम, सागर गुंड,नानासाहेब झिने, बापू बेरड, गंगाधर पटारे, जानकीराम बनकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ.कर्डिले म्हणाले की, मागील पाच वर्षात सर्वाधिक विकास निधी भाजप सरकारमुळे मिळाला. राज्यात पुन्हा सत्तेवर भाजप सेनेच सरकार येणार असल्यामुळेच राष्ट्रवादीतील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येतात. वांबोरी चारी टप्पा दोन मध्ये पिंपळगाव माळवी येथील तलावाचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
- Ministry of Defence Bharti : मुंबई संरक्षण मंत्रालयात निघाली भरती; ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी!
- Ahmednagar News : नगर अर्बन बँक बचाव संघर्ष समितीने आजच्या आज आपले काम त्वरीत थांबवा !
- Nashik Bharti 2024 : नाशिक ECHS मध्ये ‘या’ रिक्त पदांकरिता निघाली भरती! वाचा सविस्तर…
- LIC Policy : LIC मध्ये गुंतवणूक करताय? मग, ही योजना तुमच्यासाठी असेल उत्तम..
- लॉन्चपूर्वीच समोर आली OnePlus Nord CE4 ची किंमत, ‘या’ तारखेला मार्केटमध्ये करणार एंट्री!