सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण मंदावल्यामुळे धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी शनिवारी बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणात शनिवारी सायंकाळी १०४.८१ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा ९९.९२ टीएमसी आहे. शुक्रवारी धरणाचे सहापैकी दोन दरवाजे एक फुटांनी वर उचलून त्यातून विनावापर पुर्वेकडे पाणी सोडण्यात येत होते.
परंतु पाऊस मंदावला असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाल्यामुळे शनिवारी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आणि विसर्ग २१०० क्युसेक ठेवण्यात आला आहे. धरणातील पाणीपातळी २१६३.०२ फूट झाली आहे. दिवसभरात कोयनानगर १ एकुण ६९२७, नवजा ४ एकूण ८०५७ आणि महाबळेश्वर येथे ६ एकूण ६९९२ मि. मी. पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे.
- एका महिन्यातच गुगलचा युटर्न, ‘अहिल्यानगर’ नाव काढलं, आता Google Maps वर पुन्हा अहमदनगर !
- Ahmednagar Politics : नीलेश लंके फकिरच ! जंगम मालमत्ता घटली , कर्जही वाढले
- हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज भरण्याची नौटंकी ! निलेश लंके मंदिर बंद असताना गप्प का बसले होते ? विजय औटींचा घणाघात
- काय सांगता! फक्त 16 हजार रुपयांमध्ये मिळत आहे iPhone 15, कुठे सुरु आहे ऑफर? बघा…
- NIN Bharti 2024 : पुण्यातील राष्ट्रीय पोषण संस्थेत निघाली भरती, अशा पद्धतीने करा अर्ज!