लखनौ : उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात मुबलक पाऊस पडला आहे. हा मुबलक पाऊस पडण्यामागे योगी सरकारच्या काळात गोहत्येमध्ये झालेली घट कारणीभूत आहे. गोहत्येमध्ये घट झाली म्हणूनच कुठेही दुष्काळ जाणवला नाही आणि पाऊसही समाधानकारक पडला असल्याचा दावा उत्तरप्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री जयप्रकाश निषाद यांनी केला आहे.
निषाद म्हणाले,जेव्हापासून उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार बनले आहे, तेव्हापासून राज्यातील सर्व अवैध कत्तलखाने बंद झाले, तसेच राज्यात गोहत्येचे प्रमाणही कमी झालेले आहे. याची फलनीती म्हणजे निसर्गाने भरपूर साथ दिली आणि प्रचंड पाऊस पडला, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशातील पशुसंवर्धन मंत्री जयप्रकाश निषाद यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजना आणि विभागाच्या कामगिरीची माहिती दिली. तसेच मत्स्यपालनासाठी मच्छीमारांना डोळ्यांसमोर ठेवून उचललेल्या पाऊलाची माहितीही निषाद यांनी यावेळी दिली.
- Ahmednagar Breaking : युवकाचे अपहरण करून निर्घृण खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडाखाली पुरला
- खोटं बोल पण रेटून बोल हा तर शरद पवारांचा धंदाच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल
- AIATSL Pune Bharti 2024 : 10 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना पुण्यात नोकरीची उत्तम संधी; ‘या’ पत्त्यावर मुलाखतीसाठी रहा हजर…
- ठरलं तर ! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित डॉ. सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज…
- मोदीना पंतप्रधान बनविण्यासाठी सुजय विखे पाटील यांच्या रुपाने उमदा शिलेदारला निवडून पाठवायचे !