इस्लामपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचे काटे बंद पडले आहेत. त्यांचे आता काही काम उरलेले नाही, असे राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी गद्दारांना महायुतीत थारा न देण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्याच्या भल्यासाठी महायुतीची घोषणा केली. पण उमेदवारी मिळाली नाही, म्हणून महायुतीची साथ सोडणाऱ्या बांडगुळांना पुन्हा महायुतीत प्रवेश देणार नाही.
यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट करत, उध्दव ठाकरेंनी येथील यल्लमा चौकात महायुतीने सत्तेत आल्यानंतर कामे केली म्हणूनच धनगर, मुस्लिम समाज युतीसोबत असल्याचा दावा केला.
अस्थिर सरकारला शिवसेनेने स्थिर केले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठवले. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीने तुंबड्या भरायचे काम केले, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
- आ.निलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनाम्याची घोषणा, विधानसभा अध्यक्षांना पाठवला राजीनामा.. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा लढवणार
- PM Surya Ghar Yojana: घराच्या छतावर सोलर रूप-टॉप बसवा आणि 300 युनिट वीज मोफत मिळवा! अशा पद्धतीने करा घरबसल्या अर्ज
- Tourist Place: उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात रेल्वेने प्रवास करून भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या! प्रवासाचा मिळेल सुखद आनंद
- SBI New Rule: स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता ‘या’करिता द्यावे लागतील जास्त पैसे! स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर हे वाचाच….
- Traffic Rule: तुम्हाला माहित आहेत का ‘हे’ तीन महत्त्वाचे वाहतुकीचे नियम? यामध्ये तुम्हाला पोलीस नाही देऊ शकत त्रास