राहुरी : देशाचे गृहमंत्री २० वेळा महाराष्ट्रात येतात आणि शरद पवारांनी काय केले? असा सवाल करतात. पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा. मी मुख्यमंत्री असताना महिलांना ५० टक्के आरक्षण दिले.
यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा केली, मात्र स्मारकाची वीटसुद्धा रचली नाही, यात पाच वर्षं सरली.
महाराष्ट्रातील किल्ल्यांत सरकार हॉटेल्स उभी करून तिथे छम छम वाजवणार आहे का? हा एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, कुस्ती एकतर्फी होणार आहे, पण कदाचित त्यांना माहीत नसावे मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे, असा टोलाही खा. शरद पवार यांनी लगावला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचार सभेत खा. पवार बोलत होते.
- PM Surya Ghar Yojana: घराच्या छतावर सोलर रूप-टॉप बसवा आणि 300 युनिट वीज मोफत मिळवा! अशा पद्धतीने करा घरबसल्या अर्ज
- Tourist Place: उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात रेल्वेने प्रवास करून भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या! प्रवासाचा मिळेल सुखद आनंद
- SBI New Rule: स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता ‘या’करिता द्यावे लागतील जास्त पैसे! स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर हे वाचाच….
- Traffic Rule: तुम्हाला माहित आहेत का ‘हे’ तीन महत्त्वाचे वाहतुकीचे नियम? यामध्ये तुम्हाला पोलीस नाही देऊ शकत त्रास
- शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार, आ. नीलेश लंके दुपारी राजीनामा देणार !