अहमदनगर ;- महानगर पालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा सभागृहाचा दोन वर्षापुर्वी ठराव झालेला असताना पुतळा तातडीने बसविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुमार वाकळे, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, संपत बारस्कर, मनोज कोतकर यांच्यासह 11 शिवप्रेमी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
सदर पुतळ्याचे काम प्रगतीपथावर न आल्यास 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी मनपाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा चारही नगरसेवकांनी दिला आहे. मागील दोन वर्षापुर्वी महापालिकेच्या आवारात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास मनपाच्या सभागृहाने मंजुरी दिलेली आहे.
मात्र त्याच्या परवानगीसाठी एवढा मोठा कालावधी निघून गेला आहे. माजी उपमहापौर छिंदम याने वादग्रस्त वक्तव्याने शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याचवेळी महापालिकेत पुतळा बसविण्याची मागणी करण्यात आली होती.
या संदर्भात सर्व नगरसेवकांनी ठराव देखील मंजुर केला होता. या ठरावाची अंमलबजावणी अद्यापि झाली नसल्याचे कुमार वाकळे यांनी निदर्शनास आणून दिले. सदर पुतळा बसविण्याची कार्यवाही न झाल्यास चारही नगरसेवकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
- Mini Tractor: छोट्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे महिंद्राचे ‘हे’ पावरफूल मिनी ट्रॅक्टर! कामात दमदार आणि किंमत देखील आहे कमी
- उद्योजक व्हायचे आहे तर मराठा/ कुणबी तरुणांसाठी आहे मोठी संधी! ताबडतोब ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
- पुण्याचा माणूस होता अहमदनगरचा दुसरा खासदार ! कोण होते आर. के. खाडिलकर ?
- अहमदनगर लोकसभेचे पहिले खासदार कोण ? नगरमधून पहिल्यांदा भारताच्या संसदेत कोणी पाय ठेवला ?
- जनता जल से. यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा