अहमदनगर :- भारत – पाक सिमेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना अहमदनगर जिल्ह्यातील सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे.
कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती.
लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच त्यांना नायब सुभेदारपदी बढती मिळाली होती.
जवान वाल्टे त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक नववीत शिकणारी मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत.
वाल्टे यांचे प्राथमिक शिक्षण दहीगावमध्ये झाले होते. त्यानंतर कोपरगावमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले.
मंगळवारी झालेल्या कारवाईच्या वेळी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही.
- उन्हाळ्याच्या सुट्टीत महाराष्ट्रातील भाविकांना वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याची संधी! महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावर धावणार उन्हाळी स्पेशल ट्रेन, वाचा वेळापत्रक
- Samsung Galaxy : सॅमसंगने ग्राहकांना दिली मोठी भेट, ‘हा’ 5G फोन केला स्वस्त, बघा खास ऑफर…
- शेती व दुग्ध उत्पादन खा. सुजय विखेंचा उत्पनाचा सोर्स ! जनावरे, दागिने, शेअर्स.. टोटल किती आहे संपत्ती? पहा..
- Arjun Fruit : समस्या अनेक उपाय एक! आजच आहारात करा या फळाचा समावेश, आरोग्याला होतील अनेक फायदे!
- Ahmednagar Politics : ‘उत्तर नगरचं ‘जितराब’ दक्षिणेत येऊ देऊ नका..’ ! १९९१ मध्ये शरद पवारांनी केलं होत आवाहन अन विखे-पवार घराण्यात पहिली ठिणगी पडली..