अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची.
केडगाव हत्याकांडात जगताप यांच्यावर आरोप झाल्यानंतर कैलास गिरवले यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. तेथे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिस कोठडीत असतानाच गिरवले यांचा मृत्यू झाला होता. शेवटपर्यंत साथ देणाऱ्या गिरवलेंबाबत जगताप कुटुंबीयांमध्ये आजही आस्था व आपुलकीचे नाते कायम आहे. त्यामुळेच जगताप यांनी निकालानंतर गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.
- Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? युवकास कारमधून पळवले, त्यानंतर मारहाण केली, नंतर…
- Bank Holiday April 2024 : 20 एप्रिल ते 5 मे दरम्यान इतके दिवस बँका बंद राहतील बँका; पाहा सुट्ट्यांची यादी
- बेसुमार वृक्षतोडीला वनविभागाचे अभय ! अधिकारी फोनच उचलत नाहीत…
- Ahmednagar News : तरुणाला मारले, पुरावा संपवण्यासाठी दगडात पुरला मृतदेह .. पोलिसांनी २४ तासात लावला छडा
- धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत ! मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खा. लोखंडेंना साथ द्या