राहुरी :- कर्जाचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने आलेल्या नैराश्यातून गडदे आखाडा येथील अविवाहित तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री राहुरीच्या गडदे आखाडा येथे ही घटना घडली.
भारत बारकू गडदे (२४) याने दोन वर्षांपूर्वी फायनन्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. भारतने दोन सहामाही हप्ते व्याजासह भरले होते. मात्र, नंतर हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेला.
ट्रॅक्टर माघारी आणण्यासाठी भारतने उसनवार करून पैसे जमवले. मात्र, या ट्रॅक्टरचा लिलाव झाल्याने भारतचे प्रयत्न निष्फळ ठरले. नैराश्य आलेल्या भारतने घरातील आढ्याला गळफास घेत या जगाचा निरोप घेतला.
भारतचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. कर्जाचा हप्ता थकल्याने ट्रॅक्टरचा झाला लिलाव काम न मिळाल्याने अडचणींत पडली भर भारत गडदे हा अल्पभूधारक शेतकरी होता. जोडधंद्यासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन त्याने ट्रॅक्टर घेतला होता.
मात्र, गळीत हंगामात ऊसतोडणी कामासाठी जुगाड मिळाले नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने हा आघात भारतला सहन झाला नाही.
- Multibagger stocks : अनिल अंबानींचा शेअर तुफान…फक्त 4 वर्षांत घेतली मोठी झेप…!
- प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा बी टीम शिक्का ! कार्यकर्त्यांना आवाहन करणारे पत्र लिहिले
- Summer Diet : खइके पान बनारस वाला! उन्हाळ्यात विड्याचे पान खाण्याचे चमत्कारिक फायदे; शेवटचा फायदा नक्की वाचा…
- साठ हजार रुपये पगार असलेल्या पोलिसाने घेतली ५ हजारांची लाच ! रंगेहाथ पकडले आणि…
- भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली ! दुप्पट होण्याचा अंदाज…