अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले, जनादेश महायुतीला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांनी सत्ता स्थापन करायला हवी होती. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री व कमी जागा असेल त्यांचा उपमुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते, पण हा निर्णय शेवटी वरिष्ठांचा असतो.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांना एकरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
- Ahmednagar Water Issue : पुढारी सगळे मत मागत फिरतायत.. मते मागायला दारात या…. मग आमचा हिसका दाखवू…
- अहमदनगर ब्रेकिंग : प्राजक्त तनपुरेंसह सात उमेदवारांचे अर्ज दाखल
- Horoscope Today : कुंभ राशीसह आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असेल स्पेशल, वाचा…
- Budh Gochar : पुढील महिन्यात बुध दोनदा बदलेल आपला मार्ग, ‘या’ 3 राशीच्या लोकांना होईल सर्वाधिक फायदा!
- फिल्टरच्या अशुद्ध पाण्याची तालुक्यात जोरदार विक्री