जूनअखेर हे काम पूर्ण करा – मंत्री बाळासाहेब थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मुंबई : निळवंडे धरणाचे काम येत्या जूनअखेर पूर्ण करून धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होईल, यासाठी निळवंडे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती देऊन, कालबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचे आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
मंत्रालयात उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-२) संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रकल्पाचा पूर्ण आढावा घेऊन प्रकल्पाच्या कामात काय अडचणी आहेत, त्या जाणून घेतल्या आणि प्रकल्पाला गती देण्याचे आदेश थोरात यांनी दिले.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि पाणीप्रश्न सोडवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रकल्पासाठी निधीची कमतरता नाही.
पण कामाला पाहिजे त्या प्रमाणात गती दिसत नाही. यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याचे नियोजन करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून प्रकल्प पूर्ण करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Leave a Comment