आणि बाळासाहेब थोरातांनी सोडविला श्रीरामपूरचा पाणीप्रश्न !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- निळवंडे धरणातून शुक्रवारी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. श्रीरामपूरमधील नगरपालिकेच्या साठवण तलावाने तळ गाठल्याने शहरास गाळमिश्रित पाणी पुरवठा होत होता.बेलापूरचा पासनी साठवण तलाव दहा ते बारा दिवसांपासून कोरडा झाला होता.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचे आवर्तन सोडण्याची गरज असल्याने येथील नेते करण ससाणे, आमदार लहू कानडे, बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, संजय गोसावी आदींनी नागपूरमध्ये मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली.

मंत्री थोरात यांनी तातडीने पाटबंधारे विभागाचे नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे व नगरचे कार्यकारी अभियंता नान्नोर यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधून तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याच्या सूचना केली. त्यानुसार शुक्रवारी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीशिवाय अधिकारी आवर्तनाचा निर्णय घेत नसल्याने हे आवर्तन लांबले होते. मात्र मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला, असे ससाणे यांनी बोलताना सांगितले.

दरम्यान, शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी बंद जलवाहिनीतून पाणी पुरवठा करण्याची मागणी पुढे आली आहे. उन्हाळ्यात शहराला पाण्याचा पुरवठा कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचीही गरज निर्माण झाली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment