श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती व्हावी : आमदार लहू कानडे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- श्रीरामपूरमध्ये जिल्हा प्रशासनाला आवश्यक सर्व बाबी, शासकीय कार्यालये असून शेती महामंडळाची जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या कल्याणासाठी श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी विधानसभेत केली.

हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर ते गुरुवारी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात आकारमानाने सर्वात मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्याच्या विभाजनाची गरज आहे.

एकेकाळी देशातील मोठी साखरेची बाजारपेठ असलेल्या श्रीरामपूरला नेवासेफाटा ते बाभळेश्वर रस्ता एकेरी असल्याने दळणवळण सुविधेअभावी विकासाला खीळ बसली आहे.

हा रस्ता चौपदरी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचा फायदा श्रीरामपूर व नेवासे या तालुुक्यांना होणार आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment