अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, म्हणाले मी आता निवृत्ती घ्यायला हवी ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शतकाचे महान नायक अमिताभ बच्चन यांना रविवारी आणखी एका पुरस्काराने गौरविण्यात आलेय,अमिताभ बच्चन यांना सिनेमा जगातील सर्वात मोठा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्यानंतर बच्चन यांनी सर्वांचे आभार मानले.

https://twitter.com/PIB_India/status/1211254647735767042

 

हा पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांनी विनोदपूर्वक प्रश्न विचारला की हा पुरस्कार मिळाला म्हणजे आता काम थांबवून घरी बसून आराम करू शकतो ? हा प्रश्न एकताच राष्ट्रपती भवनातील उपस्थित प्रत्येकजण ही हसू लागला.

अमिताभ यावेळी म्हणाले, “दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची सुरवात सुमारे 50 वर्षांपूर्वी सुरू झाली होती आणि योगायोगाने मी सुध्दा गेल्या 50 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले, “ज्यावेळी या पुरस्काराची घोषणा झाली, त्यावेळी माझ्या मनात एक शंका आली की, तुम्ही भरपूर काम केलात, आता घरी बसून आराम करा, असे संकेत तर यांना द्यायचे नाही ना? पण, अजूनही माझं थोडं काम बाकी आहे, जे मला पूर्ण करायचं आहे. यापुढेही मला काम करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे.”

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाला त्यांची पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेकही उपस्थित होता.

यावेळी बोलताना बच्चन म्हणाले, “मला पुरस्कारासाठी पात्र समजलं. त्याबद्दल भारत सरकार, माहिती प्रसारण मंत्रालय आणि निवड समितीचे आभार. आई वडिलांचे आशीर्वाद आणि भारतीय जनतेच्या निष्ठापूर्वक प्रेमामुळे काम करता आलं. सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. नम्रतेने हा पुरस्कार स्वीकारत आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment