अहमदनगर जिल्हाविभाजनाचा निर्णय नामदार बाळासाहेब थोरातांकडे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हा विभाजनाची चर्चा पुन्हा सुरू झाली असून त्याचा चेंडू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूलमंत्री थोरातांच्या कोर्टात टोलावला आहे. 

जिल्हा विभाजनाचा निर्णय मंत्री थोरात यांना विचारून सांगू, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. 

नगर जिल्हा विभाजनाची चर्चा गत पाच-सात वर्षांपासून सुरू आहे. मध्यतंरीच्या काळात जोर धरलेली ही चर्चा काहीशी थांबली होती. त्यासदंर्भात पत्रकारांनी मंत्री मुश्रीफ यांना प्रश्‍न विचारला. 

त्यावर उत्तर देताना मुश्रीफ यांनी ‘महसूलमंत्री थोरात यांना विचारून सांगतो’ असे उत्तर देत विभाजनाचा निर्णय थोरातांकडे टोलावला. जिल्हा विभाजन झाल्यानंतर उत्तर जिल्ह्याच्या मुख्यालयाचा प्रश्‍नाही तितकाच चर्चेचा आहे. 

उत्तरेतील दोन दिग्गज नेत्यांच्या ओढताणीच हा निर्णय झाला नव्हता. आता केवळ मंत्री थोरात हेच निर्णय घेणार असल्याने मुख्यालयाचा प्रश्‍न निकाली निघेल अशी अपेक्षा नगरकरांना आहे. 

पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या बिजमाता राहीबाई पोपेरे,आदर्शगाव हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, माजी क्रिकेटपटू जाहीर खान यांचेही मंत्री मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™

 

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment