माजीमंत्री मधुकर पिचड म्हणाले त्या प्रकरणाशी माझा काहीही सबंध नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सन २००४ ते २००९ या कालावधीत विविध विकास योजना राबविताना अधिकाऱ्यांनी अपहार केल्याचे उघड झाल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल झाले.

याच्याशी आपला काहीही संबंध नाही, असे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी सांगितले. राजूर प्रकल्प कार्यालयातील अपहारप्रकरणी पिचड यांना विचारले असता पिचड बोलत होते.

ते म्हणाले, सन २००४ ते २००९ या कालावधीत विजयकुमार गावित हे आदिवासी विकास मंत्री होते. याबाबत बहिरम नावाच्या व्यक्तीने आदिवासी विभागात भ्रष्टाचार झाला म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याचिकाकर्त्यांच्या वतीने नंदुरबारचे ॲड. रघुवंशी यांनी काम पाहिले. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. तेव्हा सेवानिवृत्त न्यायाधीश एस. जी. गायकवाड यांची समिती याप्रकरणी चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आली.

या समितीने चौकशी करून अहवाल दिला. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयात आदिवासी विकास विभागाने प्रतिज्ञापत्र दाखल केले तेव्हा मी मंत्री होतो. औरंगाबाद उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायाधीश समितीने चौकशी करा, असे आदेश दिले होते.

सेवानिवृत्त न्यायाधीश एस. जी. गायकवाड यांची नियुक्ती आपल्याच कालावधीत झाली होती. त्यांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे चौकशी होऊन आता कारवाई होत आहे. तेव्हा हे अपहार प्रकरण माझ्या कालावधीत झालेले नाही.

या अपहारप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती माझ्या कालावधीत झालेली असल्याने सद्यस्थितीला कारवाई सुरू असून, गुन्हे दाखल झाले आहेत, असेही पिचड म्हणाले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment