दिशाहीन अर्थशून्य संकल्प – ना. बाळासाहेब थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थ संकल्प सदर केला. सर्व स्थरावरून  सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत उलट सुलट सूर ऐकायला मिळत आहेत. दिशाहीन अर्थशून्य संकल्प असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

केंद्र सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली असून आजचा अर्थसंकल्प म्हणजे दिशाहीन अर्थशून्य संकल्प आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

ते म्हणाले, मोदी सरकारचा अर्थसंकल्प फक्त हेडलाईन मॅनेजमेंट करणारा आहे, यातून सर्वसामान्य जनतेला ठोस काही मिळाले नाही. या अर्थसंकल्पात महाराष्ट्र कोठे आहे? सर्वाधिक कर देणार्‍या मुंबई आणि महाराष्ट्राची घोर निराशा केली आहे. मोदी सरकारला महाराष्ट्राचे वावडे आहे का? असा संतप्त सवाल थोरात यांनी केला.

शेतकर्‍यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा जाहीर केले आहे. 2014 पासून सातत्याने सरकार हेच सांगत आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर कृषी क्षेत्राचा विकासदर 11 टक्के असला पाहिजे.

पण आज तो फक्त 2 टक्के आहे, त्यामुळे ही घोषणा देखील पोकळ आणि फसवी आहे. पाच नवीन स्मार्ट सिटी आणि शंभर नवीन विमानतळ उभारण्याची अर्थमंत्र्यांनी आज घोषणा केली. मात्र या अगोदरच्या 100 स्मार्ट सिटीचे काय झाले? हे अर्थमंत्र्यांनी सांगितलं नाही. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या कमी करण्याबाबत या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस उपाययोजना नाही असेही ना. थोरात म्हणाले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment