अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टर शेतकर्‍यासह विहिरीत पडल्याने शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस आणि रिक्षाची जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातही असाच प्रकार घडलाय.

कर्जत शहरापासून 2 किमी अंतरावर असलेल्या जामदारवाडा येथे मोहनराव लाढाणे या शेतकर्‍याच्या विहिरीमध्ये टॅक्टरसह पडून कानिफनाथ रामदास बळे (वय 22) या शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत कर्जत पोलीस स्टेशन येथे संतोष अंकुश घालमे याने कर्जत पोलीस स्टेशनला खबर दिली की, संतोष घालमे हा जमदारवाडा येथे त्यांचे सासरे शिवाजी हरिभाऊ काळे यांच्या घरी आज दि. 2 फेबुवारी रेाजी कामानिमित्त आला.

दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवाजी हरिभाऊ काळे हा घरी पळत आला आणि कानिफनाथ हा मोहनराव लाढाणे यांच्या विहिरीमध्ये टॅक्टरसह पडला आहे,असे सांगितले.

यानंतर सर्वजण घटनास्थळी गेले असता विहिरीमध्ये पाणी असल्याने ट्रॅक्टर किंवा कानिफनाथ कोणीच दिसत नव्हते. मात्र विहिराच्या पाण्यावर डिझेलचा तवंग आणि काठावर टॅक्टर पडल्याच्या खुना दिसत होत्या.

त्यानंतर नातेवाईकांना बोलविण्यात आले व मोटारीच्या साहय्याने विहिरीतील पाणी बाहेर काढल्यावर खाली ट्रॅक्टर पडल्याचे दिसून आले. क्रेनच्या साहाय्याने टॅक्टर बाहेर काढण्यात आला.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment