अजित पवारांच्या ‘कारखान्याचे’चे दूषित पाणी ओढ्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथे असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंबालिका साखर कारखान्याचे रसायन व मळीमिश्रित सांडपाणी थेट कारखान्याजवळील ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे.

या पाण्यामुळे खालच्या भागातील गावे वस्त्यांवरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्यातील मासे व इतर जलचरही मृतावस्थेत आढळून येत आहेत.

हा ओढा पुढे भीमा नदीला मिळतो. त्या ठिकाणी उजनी धरणाच्या पाण्याचा फुगवटा आहे. कारखान्याच्या सांडपाण्यामुळे भीमा नदीही प्रदूषित होत आहे. बारडगाव सुद्रिक गावामध्ये अंबालिका खासगी कारखाना आहे.

या कारखान्याजवळून लोहकरा नावाचा ओढा वाहतो. या ओढ्यामध्ये कारखान्याचे सांडपाणी सोडण्यात आले असून, हे पाणी मळीमिश्रित व रसायनयुक्त आहे. बारडगाव, हिंगणगाव, भांबोरा या तीन गावांमधून ओढा वाहत जातो.

चार वर्षांपासून सांडपाणी ओढ्यात सोडले जात असून, सुरुवातीला कमी पाणी य़ेत असल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास जाणवत नव्हता. यंदा कारखान्याचे गाळप सुरू झाल्यापासून दोन महिन्यांपासून ओढा हा प्रदूषित झाला आहे.

रसायनामुळे पाण्यावर पांढरा फेस आला आहे. या ओढ्यामध्ये सर्वत्रच पांढरा फेस आला असून, पाणी काळसर दिसत आहे. सुमारे तीन किलोमीटर परिसरात पाण्याची दुर्गंधी पसरली आहे.

त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भांबोरा गावाला पाणीपुरवठा करणारी विहिर याच ओढ्याच्या बाजूला आहे. हे खराब पाणी विहिरीत खराब पाणी उतरले असून, तेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment