अवकाळी पावसाने शेतकरी व नागरीकांची उडाली धांदल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर :- तालुक्यातील आश्वीसह परिसराला शनिवारी सायंकाळी सुमारे तासभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी व नागरीकांची चागलीच धांदल उडाली. 

गव्हाच्या पिकाचे नुकसान झाल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली. शनिवारी सकाळी थंडी वाजत होती, तर दुपारी आभाळ आल्याने हवेत उष्णता वाढली होती.

सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे आश्वीसह परिसराला एकाच दिवशी हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन ऋतू अनुभवायला मिळाले.

तासभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी, नागरीक, ऊसतोड कामगार व मजुरांची चांगलीच धांदल उडाली. या पावसामुळे आश्वी बुद्रुक येथिल शेतकरी योगेश रातडीया यांचा काढणीला आलेला गहू भुसपाट झाल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

तसेच परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. बेमोसमी पावसामुळे अनेक ठिकाणी गहू भूईसपाट झाल्याचे चित्र होते. यावेळी काही काळासाठी वीज पुरवठा खंडीत झाला होता.

ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये अतिवृष्टी झाली होती. यात पूर्ण खरीप हंगाम वायाला गेला होता. दोन महिन्यातच रब्बी पिकांना पुन्हा अवकाळीचा फटका बसल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment