जिल्ह्यातील या 35 गावांना होतोय दूषित पाणीपुरवठा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अहमदनगर : जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील पाण्याचे 1305 नमुने तपासण्यात आले. त्यांत 35 गावांतील सुमारे 63 नमुने दूषित आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण यांच्यातर्फे मागील महिन्यात पाण्याचे नमुने तपासण्यात आले.
यामध्ये 63 नमुने दूषित असल्याचा अहवाल आला आहे. दर महिन्याला जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले जातात. या वर्षात मागील महिनाअखेरपर्यंत 20 हजार 382 नमुने तपासण्यात आले. त्यातील 1125 नमुने दूषित असल्याचा अहवाल आला आहे. कर्जतमधील एकूण नऊ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले. त्याखालोखाल संगमनेर व श्रीरामपूर, पारनेर तालुक्‍यांतील चार गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.

दूषित पाणी असलेली गावे

पारनेर: रुईछत्रपती, अळकुटी, खडकवाडी, वासुंदे. अकोले : लाडगाव, आंबेवंगण, टिटवी. नगर ः चास, टाकळी काझी, देवगाव. संगमनेर : कौठेकमळेश्‍वर, घुलेवाडी, लोहारे, मिरपूर. पाथर्डी: निपाणी जळगाव. राहुरी: बारागाव नांदूर, टाकळीमियॉं. श्रीगोंदे: कोळगाव. कोपरगाव : गोधेगाव, बोलकी, संवत्सर. कर्जत : बजरंगवाडी, वालवड, कारेगाव, पिंपळवाडी, पोटरे वस्ती, कोंभळी, थेरगाव, निमगाव गांगर्डा. राहाता : तिसगाव मोठेबाबानगर, एकरुखे, बोरावके वस्ती. श्रीरामपूर : भोकर, खिर्डी, गुजरवाडी, टाकळीभान.

Leave a Comment