शेतकऱ्यांना सातबारा घेऊन फिरण्याची गरज नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी बँकेत किंवा शासकीय कार्यालयात सातबारा घेऊन फिरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे, ते कार्यालय संबंधित शेतकऱ्याचा सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून घेईल. याबाबतचा शासकीय निर्णय लवकरच निघेल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा व खाते उतारा ऑनलाइनचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, ते लवकरच पूर्ण होईल.

त्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी बँकेत किंवा शासकीय कार्यालयात सातबारा घेऊन फिरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे, ते कार्यालय संबंधित शेतकऱ्याचा सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून घेईल. याबाबतचा शासकीय निर्णय लवकरच निघेल.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment