विवाहितेचा विनयभंग करून पतीच्या डोळ्यात फेकली मिरची

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर- संगमनेर शहरात शिवाजीनगर परिसर विद्यानगर भागात राहणारी एक २६ वर्षाची विवाहित तरुणी महाशिवरात्रीला दर्शनासाठी जाण्यासाठी गाडीत बसत असताना  आरोपी सागर बाळासाहेब कळंबे, रा. शिवाजीनगर, राहुल आव्हाड , रा. विद्यानगर या दोघांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन धरुन ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला.

महिलेने प्रतिकार करताच गाडीच्या बाहेर ओडून मारहाण केली. यावेळी महिलेचे पती सोडविण्यास आले असता त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून शिवीगाळ करुन खून करण्याची धमकी दिली.

पिडीत तरुणीने वरीलप्रमाणे संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी सागर कळंबे व राहुल आव्हाड या दोघाविरुद्ध भादवि कलम विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment