मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राज्य मंत्रिमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन आज पासून सुरू होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे हे पहिले अधिवेशन असून विरोधी पक्ष भाजपने सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.

दुसरीकडे, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार येणार आहे.

दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल. कर्जमुक्ती संदर्भात राज्यातील 35 लाख शेतकर्‍यांची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. 20 हजार शेतकर्‍यांचे अकाऊंट असतील. हीच यादी उद्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकर्‍यांची यादी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नगर जिल्ह्यातील राहुरीतील ब्राम्हणी आणि जखणगावचा समावेश आहे.

दरम्यान, आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफी, हिंगणघाट जळीतकांड, धनगर आरक्षण, महिलांच्या सुरक्षितता, मराठा आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी, आदी विषय या अधिवेशनात मांडत विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment