मुलीचा पाठलाग केल्याने दहा तरुणांनी केला एकाचा खून 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-   सांगली-मिरज रस्त्यावरील वानलेसवाडी येथे किरकोळ वाद आणि मुलीचा पाठलाग केल्याच्या कारणातून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी दहा जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलिसांनी यांनी ही कारवाई केली. जखमी कुल्लोळी याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या मारहाणीत आकाशचा मित्र महेश कल्लोळी (१०) गंभीर जखमी झाला. पोलिसांनी संशयितांना अटक केली. मृत आकाश मूळचा गोकाकचा आहे. श्रीरामनगरमधील एका घराच्या बांधकामावर तो व त्याचे वडील रखवलदार म्हणून काम करतात.

शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला आकाश आणि महेश वालचंद कॉलेजच्या परिसरातून जात होते. त्या वेळी संशयित तेथे थांबले होते. पूर्वी किरकोळ कारणावरून झालेला वाद व मुलीचा पाठलाग केल्याच्या संशयावरून या दोघांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. त्यात आकाशचा मृत्यू झाला. शिऱ्यापघोळच्या मैत्रिणीचा संशयितांनी पाठलाग केला होता. या कारणातून त्याचा आणि संशयितांचा वादा झाला होता.

वादातूनच त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला होता. त्यानुसार संशयितांनी मारहाण केल्याचे कारण पोलिसांसमोर आले आहे. उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अमित परीट, बिरोबा नरळे, मेघराज रूपनर, कुबेर खोत, वैभव पाटील, सागर टिंगरे, आर्यन देशिंगकर, सुहेल कार्तीयानी यांनी संशयितांना ताब्यात घेतले. मुख्य संशयित विनायक कांबळे, आकाश गुरव आणि विशाल कांबळे यांना विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने अटक केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment