कमाल तापमानात चांगलीच वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत. कमाल तापमानात चांगलीच वाढ झाल्याने उन्हाचा ताप वाढला आहे; तर ढगाळ हवामानामुळे उकाडाही जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्यामुळे राज्यात थंडी गायब झाली आहे.

पुढील काही दिवस राज्यातील उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत चार ते पाच दिवस अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे, तर सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या काही भागांत शनिवारी (ता. २९) दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता.२५) विदर्भाच्या काही भागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांतील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment