काँग्रेसच्या आमदारांना ३५ कोटींची लाच!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याच्या अनुषंगाने भाजपकडून सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना तब्बल ३५ कोटींची लाच देऊन घोडेबाजार केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केला आहे.

एवढेच नव्हे, तर भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान हे मुख्यमंत्री तर नरोत्तम हे उपमुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत आहेत, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले की, मध्य प्रदेशात काँग्रेसच्या आमदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी भाजपकडून २५ ते ३५ कोटींची लाच दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात ५ कोटी घ्या.

राज्यसभा निवडणुकीनंतर दुसरा हप्ता आणि बहुमत चाचणीनंतर तिसरा हप्ता दिला जाईल, अशी कथितरीत्या ग्वाही भाजपचे नेते देत आहेत; परंतु हा मध्य प्रदेश आहे, कर्नाटक नव्हे. आमचे आमदार बिकाऊ नाहीत. त्यामुळे राज्यात भाजपचा कोणताही डाव यशस्वी होणार नाही.

विशेषत: शिवराजसिंह चौहान आणि नरोत्तम यांची खेळी अयशस्वी होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, दिग्विजय सिंहांच्या आरोपांना भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दिग्विजय सिंह हे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. खरे पाहता खोटे बोलणे ही त्यांची जुनी सवय आहे, असा पलटवार शिवराजसिंह यांनी केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment