महाविकास आघाडी सरकारबाबत आमदार शिवाजी कर्डिले म्हणतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / करंजी :– राज्यातील शेतकऱ्याला भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. सरसकट कर्जमाफी केली जात नाही. दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचवणाऱ्या छावणीचालकांकडे डोळेझाक केली जात आहे.

एकूणच राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे, अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली.

पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे जिल्हा परिषदेंतर्गत मंजूर सुमारे साठ लाख रुपये खर्चाच्या पिसेवस्ती, डोळसेवस्ती या रस्त्याच्या कामासह सभामंडप, दलित वस्तीतील पाइपलाइन या कामाचे उद्घाटन या वेळी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती बाळासाहेब अकोलकर होते. विठ्ठल महाराज पिसे, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोतम आठरे, पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र वायकर, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी,

एकनाथ आटकर, युवा नेते संतोष शिंदे, नवनाथ आरोळे, सरपंच रामकिसन वांढेकर, रामेश्वर फसले, उपसरपंच सुखदेव वाढेकर, माजी सरपंच श्रीकृष्ण वांढेकर, मधुकर वांढेकर,

दिलीप वांढेकर, सुधाकर वांढेकर, अप्पासाहेब वांढेकर, दामू वांढेकर, संपत वांढेकर, कानिफनाथ वांढेकर, गहिनीनाथ खाडे, सुभाष डोळसे आदी या वेळी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment