या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात होणार मदत !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  शेतकऱ्यांच्या हितासाठी येत्या १५ मार्चपासून कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात मदत होईल, असे मत केंद्रीय मंर्त्यांनी आपल्या ट्विीटरवर मांडले आहे.

सरकारने मागील आठवड्यात जवळपास सहा महिन्यांसाठी कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रब्बीचे पिक चांगले आल्यामुळे दरात मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सहा महिन्यापूर्वी कांद्यासह अनेक भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. सध्या कांद्याचे दर स्थिर झाले आहेत, तसेच पीकही चांगले मिळेल अशी अपेक्षा आहे.

यामुळे निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. देशात महाराष्ट्रासह प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये पडलेला मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे खरीप हंगामात कांद्याची टंचाई निर्माण झाली. सद्यस्थितीत रब्बी पिकाची आवक सुरू झाली असून मार्चच्या मध्यापर्यंत यात वाढ होण्याची आशा आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment