अहमदनगर लाईव्ह24 टीम / पारनेर : कोरोना आटोक्यात येईपर्यंत पर्यटकांनी राळेगणसिद्धीस येऊ नये, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी केले.
राळेगण पाहण्यासाठी, अण्णांना भेटण्यासाठी विविध राज्यांतून, तसेच विदेशांतून दररोज पर्यटक येतात. कोरोनाची साथ आटोक्यात येईपर्यंत पर्यटकांनी येऊ नये, असा निर्णय राळेगणसिद्धी परिवाराने घेतला.
खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांनी कोरोना आटोक्यात येईपर्यंत राळेगणला न येण्याची विनंती करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com