शेतातील पिकांना पाणी भरणे सुद्धा झाले अवघड भीती फक्त एकच….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर : तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा गावाअंतर्गत असलेल्या जोठेवाडी येथे बिबट्याच्या हल्लातून महिला बालंबाल बचावली. महिलेने आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. 

शुक्रवारी (दि.१३) रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शुक्रवारी रात्री कांद्याला पाणी भरायचे म्हणून आंबीखालसा परिसरातील जोठेवाडी येथील नामदेव गाडेकर व त्यांच्या पत्नी संगीता हे दोघे दुचाकीवरुन शेताकडे चालले होते.

शेताजवळ आले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मागील बाजूने हल्ला केला. या हल्ल्यातून संगीता या बालंबाल बचावल्या.  त्यांनी जोरजोराने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली.

तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली होती. रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी भरणे सुद्धा अवघड झाले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment