धक्कादायक : महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाराष्ट्र राज्य कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे, अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

तर दुसरीकडे देशातील एक राज्य कोरोनाव्हायरसच्या या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेलं आहे. राजस्थानने कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे,

राजस्थान आता कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात आहे आणि त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

https://twitter.com/rajeshtope11/status/1241620917182058496

गेल्या काही तासांमध्ये मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे नवे रुग्ण समोर आले आहे.

मुंबईत 6 तर पुण्यात 4 असे 10 नवीन रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण आहे.

हे रुग्ण कोण आहेत आणि यांना कोरोनाची लागण कशी झाली याचा आता आरोग्य विभागाकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, आज कोरोनामुळे राज्यात आणखी एक मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील मृतांचा आकडा 2 झाला आहे. तर देशात एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment