कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावच्या सीमा झाल्या बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध गावांनी आपले रस्ते बंद करुन नो एन्ट्रीचे बोर्ड लावल्याचे चित्र दिसत आहे. जेऊर परिसरातील चापेवाडी रस्ता बंद करण्यात आलेला आहे.

तसेच यापुर्वीच धनगरवाडी, शेंडी गावात रस्ते बंद करुन प्रवेश निषीध्द असे बोर्ड लावण्यात आले होते. रस्ते बंद करण्याचे लोन आता तालुक्यात वेगवेगळ्या गावात पोहचल्याचे दिसुन येत आहे. डोंगरगण ग्रामस्थांनी तर गावाला जोडणारे सर्वच रस्ते चर खोदुन बंद केले आहेत.

अत्यावश्यक सेवेसाठी एक रस्ता मोकळा ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागात मुंबई,पुणे व इतर भागातून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. प्रशासनाच्या वतीने त्यांची यादी तयार करुन त्यांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

होम क्वारंटाईन बाबत हातावर शिक्के मारलेले आहेत. तरीदेखील अनेक ठिकाणी हे लोक उघडपणे फिरत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. जेऊरमध्ये बाहेरगावांवरुन आलेले सुमारे १३० जणांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आले होते.

ग्रामीण भागात अनेक जण किराणा, औषधं, दूध याच्या नावाखाली मोकाट फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळेच नागरीक संतापुन गाव, वाड्या वस्त्यांवरचे रस्ते बंद करत आहेत.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment