श्रीगोंद्यातील राजकारणी कुठे गायब झाले ? पाचपुते, जगताप, नागवडे घरात बसले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गरिबांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणा एकवटल्या, पण श्रीगोंद्यातील आजी-माजी आमदार, कारखादार, जि. प. सदस्य व नगरसेवक कुठे गायब झाले आहेत? ते जनतेची कधी मदत करणार असा सवाल राजेश डांगे यांनी बोलताना केला.

डांगे म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य हे गरिबांच्या मदतीला धावून येत असून जेवण, अत्यावश्यक वस्तू देत आहेत. परंतु श्रीगोंद्यातील राजकारणी कुठे गायब झाले ते कळत नाही.

निवडणुकीच्या काळात हेच राजकारणी स्वतःची पोळी भाजून घेण्याकरिता सर्वसामान्यांचा वापर करुन घेतात आणि आता जनतेला त्यांची गरज असताना ते मदतीसाठी पुढे येत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक सामाजिक संघटना आणि आस्थापनांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

श्रीगोंदे तालुक्यात मात्र चित्र उलट असून चीड आणणारे आहे. एखाद-दुसरा अपवाद सोडला, तर सर्वसामान्यांच्या जीवावर मोठे झालेल्यांना आज जनतेचा विसर पडला आहे, असे डांगे म्हणाले. जिल्ह्याच्या अन्य भागातही थोड्याफार प्रमाणात अशीच स्थिती असल्याने नागरिकांना असंतोष वाढत आहे.

श्रीगोंदे तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. माजी आमदार राहुल जगताप यांचा कुकडी सहकारी, राजेंद्र नागवडे यांचा नागवडे सहकारी व आमदार बबनराव पाचपुते यांचे दोन खासगी साखर कारखाने आहेत. हेच मातब्बर राजकारणी जनतेच्या अडचणीच्या काळात घरात बसले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment