भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले राजकारण करण्याची ही वेळ नाही….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेसाठी तीन महिन्यांचा धान्याचा साठा राज्य सरकारला उपलब्ध करून देऊनही पंतप्रधानांना बदनाम करण्यासाठी जनतेला या धान्यापासून वंचित ठेवण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र आहे.

केंद्राने पाठवलेल्या धान्याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी रेशन दुकानांतून त्वरित सुरू करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सर्वसामान्य जनतेला माणशी ५ किलो गहू व तांदूळ, १ किलो दाळ व तीन महिन्यांचे धान्य देण्याचे आदेश देत सुमारे ९० टक्के धान्य पुरवठा राज्याला केला असताना राज्यात वितरणाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने जनता भयभीत झाली आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही.

पंतप्रधानांनी पाठवलेल्या तीन महिन्यांच्या अन्नधान्याचे वाटप करतानाच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांनाही आधार कार्डावर अल्प दरात अन्नधान्य देण्याची मागणी गोंदकर यांनी या पत्रकात केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment